नवी दिल्ली, 29 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे शीख शिष्टमंडळाची भेट घेतली. या समूहात विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश होता. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी शीख समुदायासोबतच्या त्यांच्या प्रदीर्घ ऋणानुबंधांविषयी सांगितले. “गुरुद्वारात जाणे, सेवेत वेळ घालवणे, लंगर घेणे, शीख कुटुंबांच्या घरी राहणे हा माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. इथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी शीख संत नेहमी येत असतात. मला त्यांच्या सहवासाचे सौभाग्य मिळत राहते”, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी परदेश दौऱ्यांदरम्यान जगभरातील शीख वारसा असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्याचीही आठवण सांगितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या गुरुंनी आम्हाला धैर्य आणि सेवा शिकवली आहे. भारतातील लोक कोणत्याही साधनांशिवाय जगाच्या विविध भागात गेले आहेत आणि त्यांच्या श्रमाने यश मिळवले आहे. आजच्या नव्या भारताचीही हीच भावना आहे,” ते म्हणाले.
नवीन भारताचा जो कल आहे त्याविषयी त्यांच्या कौतुकाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान म्हणाले की, नवीन भारत नवीन शिखरे गाठत आहे आणि संपूर्ण जगावर आपली छाप सोडत आहे. कोरोना महामारीचा काळ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. महामारीच्या सुरुवातीला जुनी मानसिकता असलेले लोक भारताबद्दल चिंता व्यक्त करत होते. पण, आता लोक महामारीचा सामना करण्यासाठी भारताचे उदाहरण देत आहेत. पूर्वी भारतातील प्रचंड लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात होती आणि अनेकांना भारतीयांसाठी लसीबद्दल शंका होती. पण आज भारत सर्वात मोठा लस निर्माता म्हणून उदयास आला आहे. “आपल्याला हे ऐकून अभिमान वाटेल की 99 टक्के लसीकरण आमच्या स्वदेशी मेड इन इंडिया लसींद्वारे केले गेले आहे”, ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, या कठीण काळात भारत जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट अप परिसंस्थेपैकी एक म्हणून उदयास आला आहे. “आपल्या युनिकॉर्नची संख्या निरंतर वाढत आहे. भारताची ही वाढती उंची आणि विश्वासार्हता आपल्या परदेशातील समुदायाला जास्तीत जास्त समाधान आणि अभिमान प्रदान करते,” ते पुढे म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, “मी नेहमीच आपल्या परदेशातील भारतीय समुदायाला भारताचे राष्ट्रदूत मानले आहे. तुम्ही सर्वजण परदेशात भारत मातेचा मजबूत आवाज आणि बुलंद ओळख आहात.” ते म्हणाले की भारताच्या प्रगतीच्या वाटचालीबद्दल परदेशातील भारतीय लोकांनाही अभिमान वाटतो. “आपण जगात कुठेही असलो तरी ‘इंडिया फर्स्ट’ हा आपला प्राथमिक विश्वास असायला हवा, असेही ते म्हणाले.
गुरूंच्या महान योगदानाला आणि बलिदानाला प्रणाम करून पंतप्रधानांनी गुरू नानक देवजींनी संपूर्ण राष्ट्राचे चैतन्य कसे जागृत केले आणि देशाला तिमिरातून तेजाकडे कसे नेले याचे स्मरण केले. ते म्हणाले की, गुरूंनी भारतभर प्रवास केला आणि सर्वत्र त्यांचे संकेत आणि प्रेरणा आहेत. ते पूजनीय असून त्यांच्यावर सर्वत्र श्रद्धा आहे. गुरुंच्या पदस्पर्शाने ही महान भूमी पावन झाली आणि तेथील लोकांना प्रेरणा मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले. शीख परंपरा ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची जिवंत परंपरा आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर शीख समुदायाच्या योगदानाबद्दल देशाची कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘शीख समाज हा देशाच्या साहस, पराक्रम आणि मेहनतीला समानार्थी शब्द आहे.
पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन विशद केला. हा संघर्ष मर्यादित कालावधीपुरता मर्यादित नसून हजारो वर्षांच्या चेतना, आदर्श, आध्यात्मिक मूल्ये आणि ‘तपस्येचे’ प्रकटीकरण आहे, असे ते म्हणाले.
गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व, गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या प्रकाश पर्व आणि गुरु गोविंद सिंग याच्या 350 व्या प्रकाश पर्व यासारख्या ऐतिहासिक कार्यक्रमांशी निगडीत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या सरकारच्या कार्यकाळात करतारपूर कॉरिडॉरचे बांधकाम, लंगर करमुक्त करणे, हरमंदिर साहिबसाठी एफसीआरए परवानगी आणि पायाभूत सुविधा आणि गुरुद्वारांच्या आसपासची स्वच्छता यासारख्या घटना घडल्या आहेत, असेही ते म्हणाले.
गुरूंनी कर्तव्यावर दिलेल्या भराचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि अमृत कालमधील कर्तव्याच्या भावनेवर त्याच भराचा संदर्भ दिला आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र या भावनेचा उत्कर्ष असल्याचे सांगितले. ही कर्तव्याची जाणीव केवळ वर्तमानासाठीच नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठीही महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. पर्यावरण, पोषण आणि सांस्कृतिक मूल्यांच्या संरक्षणासाठी नेहमीच सक्रिय असल्याबद्दल त्यांनी शीख समुदायाचे कौतुक केले. अमृत सरोवरांसाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत योगदान देण्याची विनंती करून त्यांनी बैठकीचा समारोप केला.
Elated to host a Sikh delegation at my residence. https://t.co/gYGhd5GI6l
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2022
गुरुद्वारों में जाना, सेवा में समय देना, लंगर पाना, सिख परिवारों के घरों पर रहना, ये मेरे जीवन का हिस्सा रहा है।
यहाँ प्रधानमंत्री आवास में भी समय समय पर सिख संतों के चरण पड़ते रहते हैं। उनकी संगत का सौभाग्य मुझे मिलता रहता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
हमारे गुरुओं ने हमें साहस और सेवा की सीख दी है।
दुनिया के अलग अलग हिस्सों में बिना किसी संसाधन के हमारे भारत के लोग गए, और अपने श्रम से सफलता के मुकाम हासिल किए।
यही स्पिरिट आज नए भारत की भी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
पहले कहा जा रहा था कि भारत की इतनी बड़ी आबादी, भारत को कहाँ से वैक्सीन मिलेगी, कैसे लोगों का जीवन बचेगा?
लेकिन आज भारत वैक्सीन का सबसे बड़ा सुरक्षा कवच तैयार करने वाला देश बनकर उभरा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
इसी कालखंड में हम दुनिया के सबसे बड़े स्टार्टअप ecosystems में से एक बनकर उभरे हैं। हमारे unicorns की संख्या लगातार बढ़ रही है।
भारत का ये बढ़ता हुआ कद, ये बढ़ती हुई साख, इससे सबसे ज्यादा किसी का सिर ऊंचा होता है तो वो हमारा diaspora है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
हमारे भारतीय डायस्पोरा को तो मैं हमेशा से भारत का राष्ट्रदूत मानता रहा हूं।
आप सभी भारत से बाहर, मां भारती की बुलंद आवाज हैं, बुलंद पहचान हैं।
भारत की प्रगति देखकर आपका भी सीना चौड़ा होता है, आपका भी सिर गर्व से ऊंचा होता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
गुरु नानकदेव जी ने पूरे राष्ट्र की चेतना को जगाया था, पूरे राष्ट्र को अंधकार से निकालकर प्रकाश की राह दिखाई थी।
हमारे गुरुओं ने पूरब से पश्चिम, उत्तर से दक्षिण पूरे भारत की यात्राएं कीं। हर कहीं उनकी निशानियाँ हैं, उनकी प्रेरणाएं हैं, उनके लिए आस्था है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
हमारे गुरुओं ने लोगों को प्रेरणा दी, अपनी चरण रज से इस भूमि को पवित्र किया।
इसलिए, सिख परंपरा वास्तव में ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ की जीवंत परंपरा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
इसी कालखंड में करतारपुर साहिब कॉरिडॉर का निर्माण भी हुआ।
आज लाखों श्रद्धालुओं को वहाँ शीश नवाने का सौभाग्य मिल रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
लंगर को टैक्स फ्री करने से लेकर, हरमिंदर साहिब को FCRA की अनुमति तक, गुरुद्वारों के आसपास स्वच्छता बढ़ाने से लेकर उन्हें बेहतर इन्फ्रास्ट्रक्चर से जोड़ने तक, देश आज हर संभव प्रयास कर रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Sharing highlights from today’s interaction with a Sikh delegation. We had extensive discussions on various subjects and I was glad to receive their insights. pic.twitter.com/CwMCBfAMyh
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2022
Elated to host a Sikh delegation at my residence. https://t.co/gYGhd5GI6l
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2022
गुरुद्वारों में जाना, सेवा में समय देना, लंगर पाना, सिख परिवारों के घरों पर रहना, ये मेरे जीवन का हिस्सा रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
यहाँ प्रधानमंत्री आवास में भी समय समय पर सिख संतों के चरण पड़ते रहते हैं। उनकी संगत का सौभाग्य मुझे मिलता रहता है: PM @narendramodi
हमारे गुरुओं ने हमें साहस और सेवा की सीख दी है।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
दुनिया के अलग अलग हिस्सों में बिना किसी संसाधन के हमारे भारत के लोग गए, और अपने श्रम से सफलता के मुकाम हासिल किए।
यही स्पिरिट आज नए भारत की भी है: PM @narendramodi
पहले कहा जा रहा था कि भारत की इतनी बड़ी आबादी, भारत को कहाँ से वैक्सीन मिलेगी, कैसे लोगों का जीवन बचेगा?
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
लेकिन आज भारत वैक्सीन का सबसे बड़ा सुरक्षा कवच तैयार करने वाला देश बनकर उभरा है: PM @narendramodi
नया भारत नए आयामों को छू रहा है, पूरी दुनिया पर अपनी छाप छोड़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
कोरोना महामारी का ये कालखंड इसका सबसे बड़ा उदाहरण है।
महामारी की शुरुआत में पुरानी सोच वाले लोग भारत को लेकर चिंताएं जाहिर कर रहे थे।
लेकिन, अब लोग भारत का उदाहरण दे रहे हैं: PM @narendramodi
इसी कालखंड में हम दुनिया के सबसे बड़े स्टार्टअप ecosystems में से एक बनकर उभरे हैं। हमारे unicorns की संख्या लगातार बढ़ रही है।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
भारत का ये बढ़ता हुआ कद, ये बढ़ती हुई साख, इससे सबसे ज्यादा किसी का सिर ऊंचा होता है तो वो हमारा diaspora है: PM @narendramodi
हमारे भारतीय डायस्पोरा को तो मैं हमेशा से भारत का राष्ट्रदूत मानता रहा हूं।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
आप सभी भारत से बाहर, मां भारती की बुलंद आवाज हैं, बुलंद पहचान हैं।
भारत की प्रगति देखकर आपका भी सीना चौड़ा होता है, आपका भी सिर गर्व से ऊंचा होता है: PM @narendramodi
गुरु नानकदेव जी ने पूरे राष्ट्र की चेतना को जगाया था, पूरे राष्ट्र को अंधकार से निकालकर प्रकाश की राह दिखाई थी।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
हमारे गुरुओं ने पूरब से पश्चिम, उत्तर से दक्षिण पूरे भारत की यात्राएं कीं। हर कहीं उनकी निशानियाँ हैं, उनकी प्रेरणाएं हैं, उनके लिए आस्था है: PM @narendramodi
हमारे गुरुओं ने लोगों को प्रेरणा दी, अपनी चरण रज से इस भूमि को पवित्र किया।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
इसलिए, सिख परंपरा वास्तव में ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ की जीवंत परंपरा है: PM @narendramodi
इसी कालखंड में करतारपुर साहिब कॉरिडॉर का निर्माण भी हुआ।
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022
आज लाखों श्रद्धालुओं को वहाँ शीश नवाने का सौभाग्य मिल रहा है: PM @narendramodi
लंगर को टैक्स फ्री करने से लेकर, हरमिंदर साहिब को FCRA की अनुमति तक, गुरुद्वारों के आसपास स्वच्छता बढ़ाने से लेकर उन्हें बेहतर इन्फ्रास्ट्रक्चर से जोड़ने तक, देश आज हर संभव प्रयास कर रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 29, 2022