नवी दिल्ली, 12 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे. जन – सहकार्याच्या भावनेतून जन – उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा केला जाईल.
साबरमती आश्रम इथे उपस्थिताना संबोधित करताना ‘आजादी का अमृत महोत्सव’ या 15 ऑगस्ट 2022 पूर्वी 75 आठवडे सुरु होणाऱ्या आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी केले. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा गांधी आणि महान स्वातंत्र्य सैनिकांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.
स्वप्ने आणि कर्तव्ये यांची पूर्तता करताना प्रेरणा म्हणून स्वातंत्र्य लढा, 75 साठी कल्पना, 75 साठी कामगिरी, 75 साठी कृती, 75 साठी संकल्प या पाच स्तंभाचा मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुनरुच्चार केला.
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याच्या उर्जेचे अमृत, स्वातंत्र्य लढ्याच्या योद्ध्यांच्या स्फूर्तीचे , नव कल्पना आणि आत्मनिर्भरता आणि नव संकल्पांचे अमृत असे पंतप्रधानानी सांगितले.
मीठ या प्रतिकाविषयी बोलताना, मीठ हे केवळ मूल्याच्या आधारावर कधीच जोखले गेले नाही, भारतीयांसाठी मीठ म्हणजे प्रामाणिकता,विश्वास,निष्ठा,श्रम,समानता आणि आत्मनिर्भरता यांचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. त्या काळात मीठ हे भारतीयांच्या आत्म निर्भरतेचे प्रतिक होते.भारताच्या मुल्यांबरोबरच ब्रिटिशांनी स्वयं पूर्णतेची ही भावनाही दुखावल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतीय जनतेला इंग्लंडहून येणाऱ्या मिठावर अवलंबून राहावे लागत असे. गांधीजीनी देशाची ही जुनी वेदना जाणली, जनतेच्या भावना जाणल्या आणि याचे चळवळीत रुपांतर झाले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीची 1857 ची पहिली लढाई, महात्मा गांधीजींचे परदेशातून आगमन, सत्याग्रहाच्या सामर्थ्याचे देशाला स्मरण, संपूर्ण स्वराज्याची लोकमान्य टिळक यांनी दिलेली हाक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचा दिल्ली मार्च आणि चलो दिल्ली ही घोषणा यासारख्या स्वातंत्र्य लढ्यातल्या महत्वाच्या घटनांचे स्मरण पंतप्रधानांनी केले.स्वतंत्र्य लढ्याची ही ज्योत, प्रत्येक दिशेने, प्रत्येक भागात सातत्याने धगधगती ठेवण्याचे कार्य देशातल्या आचार्य,संत आणि शिक्षकांनी केले.भक्ती चळवळीने स्वातंत्र्य आंदोलनासाठी देशव्यापी पाया सज्ज केला. चैतन्य महाप्रभू,रामकृष्ण परमहंस,श्रीमंत शंकर देव यासारख्या संतानी देशभरात स्वातंत्र्यलढ्यासाठी भक्कम पाया घातला. अशाच प्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संतानी देशाच्या जाणीवा जागृत करण्यासाठी योगदान दिले. कार्य केले. देशभरातल्या अगणित दलित,आदिवासी, महिला आणि युवकानी बलिदान दिले. तामिळनाडूमधल्या कोडी कथा कुमारन या 32 वर्षाच्या युवकाचा उल्लेख त्यांनी केला. ब्रिटीशांची गोळी लागूनही देशाचा ध्वज जमिनीवर पडू न देणाऱ्या कुमारन यांच्यासारख्या प्रकाशझोतात न आलेल्या नायकांचा त्यांनी उल्लेख केला. तामिळनाडूच्या वेलू नचीयार या ब्रिटीश राजवटीविरोधात लढा देणाऱ्या पहिल्या महाराणी होत्या.
आपल्या देशातल्या आदिवासी समाजाने आपले शौर्य आणि साहसाने परकीय राजवटीला सातत्याने जेरीला आणले. झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले आणि मुर्मू बंधूनी संथाल चळवळीचा पाया घातला. ओडिशा मध्ये चक्र बिसोई यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला आणि लक्ष्मण नायक यांनी गांधीवादी पद्धतीने जागृती केली. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आंध्रप्रदेशच्या मन्यम विरूधू अलुरी सिराराम राजू यासारख्या नायकांचा त्यांनी उल्लेख केला. राजू यांनी रामपा चळवळीचा पाया घातला. देशाच्या लढ्यात योगदान देणारे, ब्रिटिशांविरोधात उभे राहणारे पासल्था खुंगचेरा, आसाम आणि ईशान्येकडच्या गोमधर कोनवर, लाचीत बोरफुकन, सेरात सिंग यांच्या योगदानाचा उल्लेखही त्यांनी केला. गुजरातमधल्या जंबूघोडा मध्ये नायक जमातीचे बलिदान, मानगड इथले शेकडो आदिवासींचे शिरकाण देश सदैव स्मरणात ठेवेल असे पंतप्रधान म्हणाले.
प्रत्येक राज्यातला प्रत्येक प्रांतातला हा इतिहास जतन करण्याचे गेली सहा वर्षे जाणीवपूर्वक काम देश करत आहे. दांडी यात्रेशी संबंधित स्थळांच्या पुनरुज्जीवनाचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. देशाचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमान मध्ये तिरंगा फडकवला त्या स्थळाचेही पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास करण्यात आला तर जालियानवाला बाग स्मारकाचा विकास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या कठोर परिश्रमाने आपण भारतात आणि भारताबाहेरही आपल्याला सिद्ध केल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपले संविधान आणि लोकशाही परंपरेचा आपल्याला आभिमान आहे. लोकशाहीची माता असलेला भारत आपली लोकशाही अधिक बळकट करत आगेकूच करत आहे. भरतची कामगिरी आणि यश संपूर्ण मानवतेसाठी आशा दायी आहे. भारताच्या विकासाचा प्रवास हा आत्मनिर्भरतेवर आधारित असून संपूर्ण जगाच्या विकासाला गती देणारा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करण्यासाठीचे देशाचे प्रयत्न पूर्णत्वाला नेण्यासाठी युवा आणि विद्वानानी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्य लढ्यातली कामगिरी जगासमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या इतिहासातल्या अनोख्या कहाण्या शोधून त्या मांडण्याचे आवाहन त्यांनी कला, साहित्य, चित्रपट जगात आणि डिजिटल माध्यमाशी निगडीत व्यक्तींना केले.
Watch Live https://t.co/Uv2cTJNlg9
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Addressing the programme to mark the start of Azadi Ka #AmritMahotsav related activities. https://t.co/Gzci5i488U
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2021
आज आजादी के अमृत महोत्सव का पहला दिन है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
अमृत महोत्सव, 15 अगस्त 2022 से 75 सप्ताह पूर्व शुरू हुआ है और 15 अगस्त 2023 तक चलेगा: PM @narendramodi
मैं इस पुण्य अवसर पर बापू के चरणों में अपने श्रद्धा सुमन अर्पित करता हूँ।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
मैं देश के स्वाधीनता संग्राम में अपने आपको आहूत करने वाले, देश को नेतृत्व देने वाली सभी महान विभूतियों के चरणों में नमन करता हूँ, उनका कोटि-कोटि वंदन करता हूँ: PM @narendramodi
Freedom Struggle,
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
Ideas at 75,
Achievements at 75,
Actions at 75,
और Resolves at 75
ये पांचों स्तम्भ आज़ादी की लड़ाई के साथ साथ आज़ाद भारत के सपनों और कर्तव्यों को देश के सामने रखकर आगे बढ़ने की प्रेरणा देंगे: PM @narendramodi
आज़ादी का अमृत महोत्सव यानी- आज़ादी की ऊर्जा का अमृत।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
आज़ादी का अमृत महोत्सव यानी - स्वाधीनता सेनानियों से प्रेरणाओं का अमृत।
आज़ादी का अमृत महोत्सव यानी - नए विचारों का अमृत। नए संकल्पों का अमृत।
आज़ादी का अमृत महोत्सव यानी - आत्मनिर्भरता का अमृत: PM @narendramodi
हम आज भी कहते हैं कि हमने देश का नमक खाया है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
ऐसा इसलिए नहीं क्योंकि नमक कोई बहुत कीमती चीज है।
ऐसा इसलिए क्योंकि नमक हमारे यहाँ श्रम और समानता का प्रतीक है: PM @narendramodi
हमारे यहां नमक को कभी उसकी कीमत से नहीं आँका गया।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
हमारे यहाँ नमक का मतलब है- ईमानदारी।
हमारे यहां नमक का मतलब है- विश्वास।
हमारे यहां नमक का मतलब है- वफादारी: PM @narendramodi
गांधी जी ने देश के इस पुराने दर्द को समझा, जन-जन से जुड़ी उस नब्ज को पकड़ा।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
और देखते ही देखते ये आंदोलन हर एक भारतीय का आंदोलन बन गया, हर एक भारतीय का संकल्प बन गया: PM @narendramodi
उस दौर में नमक भारत की आत्मनिर्भरता का एक प्रतीक था।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
अंग्रेजों ने भारत के मूल्यों के साथ साथ इस आत्मनिर्भरता पर भी चोट की।
भारत के लोगों को इंग्लैंड से आने वाले नमक पर निर्भर हो जाना पड़ा: PM @narendramodi
1857 का स्वतंत्रता संग्राम, महात्मा गांधी का विदेश से लौटना, देश को सत्याग्रह की ताकत फिर याद दिलाना, लोकमान्य तिलक का पूर्ण स्वराज्य का आह्वान, नेताजी सुभाष चंद्र बोस के नेतृत्व में आजाद हिंद फौज का दिल्ली मार्च, दिल्ली चलो का नारा कौन भूल सकता है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
आजादी के आंदोलन की इस ज्योति को निरंतर जागृत करने का काम, पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण, हर दिशा में, हर क्षेत्र में, हमारे संतो-महंतों, आचार्यों ने किया था।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
एक प्रकार से भक्ति आंदोलन ने राष्ट्रव्यापी स्वाधीनता आंदोलन की पीठिका तैयार की थी: PM @narendramodi
देश के कोने कोने से कितने ही दलित, आदिवासी, महिलाएं और युवा हैं जिन्होंने असंख्य तप-त्याग किए।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
याद करिए, तमिलनाडु के 32 वर्षीय नौजवान कोडि काथ् कुमरन को,
अंग्रेजों ने उस नौजवान को सिर में गोली मार दी, लेकिन उन्होंने मरते हुये भी देश के झंडे को जमीन में नहीं गिरने दिया: PM
गोमधर कोंवर, लसित बोरफुकन और सीरत सिंग जैसे असम और पूर्वोत्तर के अनेकों स्वाधीनता सेनानी थे जिन्होंने देश की आज़ादी में योगदान दिया है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
गुजरात में जांबूघोड़ा में नायक आदिवासियों का बलिदान हो, मानगढ़ में सैकड़ों आदिवासियों का नरससंहार हो, देश इनके बलिदान को हमेशा याद रखेगा: PM
आंध्र प्रदेश में मण्यम वीरुडु यानी जंगलों के हीरो अल्लूरी सीराराम राजू ने रम्पा आंदोलन का बिगुल फूंका
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
पासल्था खुन्गचेरा ने मिज़ोरम की पहाड़ियों में अंग्रेज़ो से लोहा लिया: PM @narendramodi
तमिलनाडु की ही वेलू नाचियार वो पहली महारानी थीं, जिन्होंने अंग्रेजी हुकूमत के खिलाफ लड़ाई लड़ी थी।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
इसी तरह, हमारे देश के आदिवासी समाज ने अपनी वीरता और पराक्रम से लगातार विदेशी हुकूमत को घुटनों पर लाने का काम किया था: PM @narendramodi
देश इतिहास के इस गौरव को सहेजने के लिए पिछले छह सालों से सजग प्रयास कर रहा है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
हर राज्य, हर क्षेत्र में इस दिशा में प्रयास किए जा रहे हैं।
दांडी यात्रा से जुड़े स्थल का पुनरुद्धार देश ने दो साल पहले ही पूरा किया था। मुझे खुद इस अवसर पर दांडी जाने का अवसर मिला था: PM
जालियाँवाला बाग में स्मारक हो या फिर पाइका आंदोलन की स्मृति में स्मारक, सभी पर काम हुआ है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
बाबा साहेब से जुड़े जो स्थान दशकों से भूले बिसरे पड़े थे, उनका भी विकास देश ने पंचतीर्थ के रूप में किया है: PM @narendramodi
अंडमान में जहां नेताजी सुभाष ने देश की पहली आज़ाद सरकार बनाकर तिरंगा फहराया था, देश ने उस विस्मृत इतिहास को भी भव्य आकार दिया है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
अंडमान निकोबार के द्वीपों को स्वतन्त्रता संग्राम के नामों पर रखा गया है: PM @narendramodi
हम भारतीय चाहे देश में रहे हों, या फिर विदेश में, हमने अपनी मेहनत से खुद को साबित किया है।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
हमें गर्व है हमारे संविधान पर।
हमें गर्व है हमारी लोकतांत्रिक परंपराओं पर।
लोकतंत्र की जननी भारत, आज भी लोकतंत्र को मजबूती देते हुए आगे बढ़ रहा है: PM @narendramodi
आज भी भारत की उपल्धियां आज सिर्फ हमारी अपनी नहीं हैं, बल्कि ये पूरी दुनिया को रोशनी दिखाने वाली हैं, पूरी मानवता को उम्मीद जगाने वाली हैं।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
भारत की आत्मनिर्भरता से ओतप्रोत हमारी विकास यात्रा पूरी दुनिया की विकास यात्रा को गति देने वाली है: PM @narendramodi
मैं कला-साहित्य, नाट्य जगत, फिल्म जगत और डिजिटल इंटरनेटनमेंट से जुड़े लोगों से भी आग्रह करूंगा, कितनी ही अद्वितीय कहानियाँ हमारे अतीत में बिखरी पड़ी हैं, इन्हें तलाशिए, इन्हें जीवंत कीजिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
हमारे युवा, हमारे scholars ये ज़िम्मेदारी उठाएँ कि वो हमारे स्वाधीनता सेनानियों के इतिहास लेखन में देश के प्रयासों को पूरा करेंगे।
— PMO India (@PMOIndia) March 12, 2021
आज़ादी के आंदोलन में और उसके बाद हमारे समाज की जो उपलब्धियां रही हैं, उन्हें दुनिया के सामने और प्रखरता से लाएँगे: PM @narendramodi