Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशच्या अनकापल्ली जिल्ह्यातील कारखान्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या अनकापल्ली जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ (पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी) मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.

पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स या समाज माध्यमावरील अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे:

आंध्र प्रदेशच्या अनकापल्ली जिल्ह्यातील कारखान्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मला अत्यंत दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे, त्यांच्याप्रति सहवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे हीच प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह मदत दिली जाईल.”

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com