नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओदिशातील कटक इथल्या प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरण पीठाचे कार्यालय तसेच निवासी संकुल इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की या नव्या पीठामुळे केवळ ओदिशातील करदात्यांनाच नाही तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील लक्षावधी करदात्यांचेही या भागात प्रलंबित असलेले अनेक खटले मार्गी लावता येतील.
देश आता कर-दहशतवादाच्या वातावरणातून कर पारदर्शकतेच्या संस्कृतीकडे वाटचाल करत आहे,असे पंतप्रधान म्हणाले. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या त्रयीमुळेच हा बदल झाला आहे, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम आणि प्रक्रियांमध्ये बदल केले जात आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छ हेतूने काम करतो आहोत आणि त्याचवेळी करव्यवस्थेतील प्रशासनाची मानसिकता बदलण्याचाही प्रयत्न करतो आहोत.
जेव्हा देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांच्या अडचणी कमी केल्या जातात, त्यांना संरक्षण दिले जाते, त्यानंतर देशातील व्यवस्थांवरचा त्यांचा विश्वास वाढतो. या वाढत्या विश्वासामुळे अधिकाधिक लोक देशाच्या विकासासाठी करव्यवस्थेत भागीदार होण्यास पुढे येत आहेत. कर कमी करण्याबरोबरच प्रक्रियेत सुलभता आणणे , प्रामाणिक करदात्यांना होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देत त्यांची प्रतिष्ठा जपणारी करसुधारणा ही सर्वात मोठी आणि अत्यंत महत्वाची सुधारणा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
करदात्यांनी कर भरल्यानंतर हे करविवरण योग्य असेल हा विश्वास ठेवणे सरकारची पहिली विचारप्रक्रिया असून त्याचाच परिणाम म्हणून, आज देशात भरले गेलेले 99.75 टक्के करविवरणपत्रे काहीही हरकत न घेता स्वीकारली जातात. देशाच्या करप्रणालीत झालेला हा मोठा बदल आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देश अनेक वर्षे पारतंत्र्यात होता. त्याचा परिणाम म्हणून करदाते आणि करसंकलक यांच्यातील संबध शोषक आणि शोषित असेच राहिले आहेत असे सांगत पंतप्रधानांनी गोस्वामी तुलसीदासांचा दोहा,
“बरसत हरसत सब लखें, करसत लखे न कोय तुलसी प्रजा सुभाग से, भूप भानु सो होय”
यावेळी सांगितला. याचा आर्थ जेव्हा मेघातून पाऊस पडतो, तेव्हा त्यचे लाभ सगळ्यांना दिसतात; मात्र जेव्हा मेघ तयार होतात, तेव्हा सूर्य त्यातील पाणी शोषून घेतो, मात्र त्यामुळे कोणालाही त्रास जाणवत नाही. तद्वतच, सरकार आणि प्रशासनाने सर्वसामान्य जनतेकडून कर संकलन करतांना कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, मात्र जेव्हा हा कर विविध सोयीसुविधांच्या रूपाने लोकांपर्यंत पोचतो, तेव्हा त्याचे लाभ लोकांच्या जीवनमा नावर जाणवायला हवे.
गेल्या काही वर्षात, केंद्र सरकार याच दृष्टीकोनातून वाटचाल करत आहे आणि त्याचेच परिणाम तसेच संपूर्ण करव्यवस्थेतील पारदर्शकता लोकांना दिसते आहे. जेव्हा करदात्याला आपल्या करपरताव्याची रक्कम केवळ काही आठवड्यात मिळते, हा अनुभव येतो, तेव्हा करदात्याला ही पारदर्शकता जाणवते. जेव्हा कर विभागाने अत्यंत जुन्या अशा खटल्यांचा निपटारा केला, असे दिसले तेव्हा त्याला पारदर्शकता जाणवली. जेव्हा चेहराविरहित अपीलचा लाभ त्यांना मिळतो, तेव्हा त्यांना कर पारदर्शकता जाणवते. जेव्हा प्राप्तिकरात सातत्याने घट होतांना दिसते, तेव्हा त्याचा विश्वास वाढतो.
पाच लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर दिली गेलेली सवलत, हा आपले युवा आणि मध्यमवर्गाला मोठा लाभ आहे, असे ते म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पात, प्राप्तिकर भरण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात सुलभ करप्रक्रिया आली आहे. विकासाची गती आणखी जलद करणे आणि भारताला गुंतवणूक स्नेही देश बनवण्यासाठी कॉर्पोरेट करात सवलत दिली गेली. उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, नव्या उत्पादक कंपन्यांचा कर दर 15 टक्के एवढा निश्चित करण्यात आला आहे. भारताच्या भांडवली बाजारात गुंतवणूक वाढवण्यासाठी लाभांश वितरण कर देखील रद्द केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जीएसटीमुळे कररचनेचे जाळे कमी झाले आणि आता, अनेक वस्तू आणि सेवांवरील कमी करण्यात आला आहे. आयटीएटी खटल्यांमध्ये अपील करण्याची मर्यादा 3 लाखांवरुन 50 लाखांपर्यंत, आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मर्यादा 2 कोटींपर्यंत वाढवल्यामुळे, देशात उद्योगसुलभतेत वाढ झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाने, आभासी सुनावणीसाठी देशभरातली आपली पीठे अद्ययावत करण्याची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या या युगात संपूर्ण व्यवस्था सातत्याने अद्ययावत करत राहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आपल्या न्यायप्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केल्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांची सोय होत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
Jaydevi.P.S/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
गुलामी के लंबे कालखंड ने Tax Payer और Tax Collector, दोनों के रिश्तों को शोषित और शोषक के रूप में ही विकसित किया।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
दुर्भाग्य से आज़ादी के बाद हमारी जो टैक्स व्यवस्था रही उसमें इस छवि को बदलने के लिए जो प्रयास होने चाहिए थे, वो उतने नहीं किए गए: PM#TransparencyInTaxation
जब बादल बरसते हैं, तो उसका लाभ हम सभी को दिखाई देता है। लेकिन जब बादल बनते हैं, सूर्य पानी को सोखता है, तो उससे किसी को तकलीफ नहीं होती।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
इसी तरह शासन को भी होना चाहिए: PM
जब आम जन से वो टैक्स ले तो किसी को तकलीफ न हो, लेकिन जब देश का वही पैसा नागरिकों तक पहुंचे, तो लोगों को उसका इस्तेमाल अपने जीवन में महसूस होना चाहिए: PM
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
आज का टैक्सपेयर पूरी टैक्स व्यवस्था में बहुत बड़े बदलाव और पारदर्शिता का साक्षी बन रहा है।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
जब उसे Refund के लिए महीनों इंतजार नहीं करना पड़ता, कुछ ही सप्ताह में उसे Refund मिल जाता है, तो उसे पारदर्शिता का अनुभव होता है: PM
जब वो देखता है कि विभाग ने खुद पुराने विवाद को सुलझा दिया है, तो उसे पारदर्शिता का अनुभव होता है।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
जब उसे faceless appeal की सुविधा मिलती है, तब वो tax transparency को और ज्यादा महसूस करता है।
जब वो देखता है कि income tax कम हो रहा है, तब उसे tax transparency अनुभव होती है: PM
पहले की सरकारों के समय शिकायतें होती थीं Tax Terrorism की।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
आज देश उसे पीछे छोड़कर Tax Transparency की तरफ बढ़ रहा है।
Tax Terrorism से Tax transparency का ये बदलाव इसलिए आया है क्योंकि हम Reform, Perform और Transform की अप्रोच के साथ आगे बढ़ रहे हैं: PM
हम Reform कर रहे हैं rules में, procedures में और इसमें technology की भरपूर मदद ले रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
हम Perform कर रहे हैं साफ नीयत के साथ, स्पष्ट इरादों के साथ।
और
साथ ही साथ हम Tax Administration के mindset को भी Transform कर रहे हैं: PM
आज भारत दुनिया के उन चुनिंदा देशों में है जहां टैक्सपेयर के अधिकारों और कर्तव्यों दोनों को codify किया गया है, उनको कानूनी मान्यता दी गई है।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
टैक्सपेयर और टैक्स कलेक्ट करने वाले के बीच विश्वास बहाली के लिए, पारदर्शिता के लिए, ये बहुत बड़ा कदम रहा है: PM
देश के Wealth Creator की जब मुश्किलें कम होती हैं, उसे सुरक्षा मिलती है, तो उसका विश्वास देश की व्यवस्थाओं पर और ज्यादा बढ़ता है।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
इसी बढ़ते विश्वास का परिणाम है कि अब ज्यादा से ज्यादा साथी देश के विकास के लिए टैक्स व्यवस्था से जुड़ने के लिए आगे आ रहे हैं: PM
अब सरकार की सोच ये है कि जो इनकम टैक्स रिटर्न फाइल हो रहा है, उस पर पहले पूरी तरह विश्वास करो।
— PMO India (@PMOIndia) November 11, 2020
इसी का नतीजा है कि आज देश में जो रिटर्न फाइल होते हैं, उनमें से 99.75 प्रतिशत बिना किसी आपत्ति के स्वीकार कर लिए जाते हैं।
ये बहुत बड़ा बदलाव है जो देश के टैक्स सिस्टम में आया है: PM